Translate

Header Ads Widget

Responsive Advertisement

नरक चतुर्दशी


नरक चतुर्दशी

                दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी.  समाजातील अहंकारी, अत्याचारी वाईट प्रवृत्तीचा नाश व्हावा, यासाठी नरक चतुर्दशी साजरी करण्यात येते. या दिवशी घर परिसराची सफाई व सूर्योदयापूर्वी अंगाला उटणे आणि तेल लावून स्नान केले जाते.  

                 द्वापर युगात, नरकासुर नावाचा असुर होता.  नरकासुर दैत्याने पृथ्वीवर त्याच्या विध्वंसक वर्तनाने नरक बनविला होता. पृथ्वीला दैन्य स्वरूप त्याने आणले होते. त्याने 16100 राजकन्या यज्ञात आहुती देण्यासाठी  स्वतःकडे बंदी बनवून ठेवले होते.  हे सर्व श्रीकृष्णाला समजल्या नंतर श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि त्यांना मुक्त केले श्रीकृष्णांनी त्यांना नवीनजीवन दिले. परंतु राजकुमारींचे पालक त्यांना घरी परत घेण्यास नकार देतात. तेव्हा त्या राजकुमारी आत्महत्या करण्यासाठी निघतात. तेव्हा श्रीकृष्ण त्यांच्याशी विवाह करतात याचाच अर्थ त्यांच्या पालकत्वाची जवाबदारी घेतात

                 मग लोक आनंदी होतात.तो दिवस आंनदाने साजरा करतात. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला त्या दिवशी अश्विन कृष्ण चतुर्दशी असते म्हणून त्या दिवसाला नरक चतुर्दशी म्हणतात. हा दिवस लोक पहाटे उठतात आणि त्याच्या शरीरावर उटणे लावतात,स्नान करतात यालाच अभ्यंग स्नान म्हणतात. 

                   अश्विन कृष्ण चतुर्दशीस  मृत्युदेवता यमराजाची पूजा करण्याची प्रथा आहे. यादिवशी दक्षिणेकडे तोंड करून दिवे ठेवले जातात. असे केल्याने कमी वयात मृत्यू किंवा नरक यातनांपासून मुक्ती  मिळते किंवा याची भीती राहत नाही असा समज आहे. दीपदान केले जाते. दिवा हा अज्ञानाचा अंध:कार दूर करण्याचे आण‌ि तेज, समृध्द‌ी यांचे प्रत‌ीक असल्याने दीपदानाचे महत्त्व मोठे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या