सुलभभारती मराठी
इयत्ता चॊथी
कविता प्रश्न
पशुपक्ष्यांना असते अवगत
जगण्याची हि कला,
माणसाला का जमत नाही ?
प्रश्न पडतो मला
चिमणी कधी म्हणत नाही
हवा मोरासारखा पिसारा,
गाय काळजी करत नाही
मिळेल का मला चार ?
कोकीळ कधी म्हणत नाही
काळा का माझा रंग ?
तो तर आनंदाने
गाण्यात असतो दंग !
बैल कधी म्हणत नाही
मीच का राबू ?
कावळा कधी विचारतो का
वापरू कोणता साबू ?
ससा कधी म्हणत नाही
मीच का भित्रा ?
वाघोबाचा शूरपणा
मागत नाही कुत्रा .
जो तो जगतो आनंदाने
नाही कसली चिंता,
माणसाच्याच मनात असतो
विचारांचा गुंता .
0 टिप्पण्या